दादा कोंडके (Dada Kondke): मराठी चित्रपटसृष्टीचा अनभिषीक्त सम्राट

by Shekhar Jaiswal

Dada Kondke

दादांचा (Dada Kondke) जन्म लालबागच्या,गिरणी-कामगाराच्या पोटी ८ ऑगस्ट १९३२ रोजी, गोकुळाष्टमीच्या शुभप्रसंगी लाभलेल्या या पुत्र’रत्ना’चे कृष्णा म्हणून नामकरण करण्यात आले.

पोरक्या वयातच या कृष्णाच्या लीला उसळून बाहेर येऊ लागल्या.शाळकरी वयातच त्यांना गल्लीतले ‘दादा’ म्हणून ओळखले जात असे, ही ‘बिरुदावली’ नंतर कायम राहिली. जेष्ठ बंधूंच्या अपतकालीन निधनामुळे घर सांभाळायची जबाबदारी आली,त्यामुळे ‘अपना बाजार‘ मध्ये दरमहा साठ रुपयाने कामावर असतानाहि दादा सेवादलाच्या बँडमध्ये सुद्काधा काम करू लागले. कलेचा नाद शांत बसू देईना, म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. सेवादलात असतानाच त्यांची गाठ निळू फुले, राम नगरकर यांच्याशी पडली आणि सेवादलाच्या नाटकांत दादा छोटी-मोठी कामे करू लागले. लहानपणापासून खोड्याळ (काहीसे मवाली) असलेल्या दादांनी ‘अपना बाजार‘ येथे नोकरी केली खर पण त्याबरोबर सोडावॉटर बाटल्या, दगड- विटांनी मारामार्या सुद्धा केल्याचे दादांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. एका वर्षातच त्यांच्या कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तींशी ते काळाने दुरावले व तेव्हा पासून एकटे पडलेल्या दादा कोंडकेंनी (Dada Kondke) जीवन हे खेळकरपणे घालवण्याचा निश्चय केला. नायगाव परिसरात ‘बॅंडवाले दादा‘ ह्या नावाने त्यांना लोकं ओळखू लागले. तेथेच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यावरही दादा तेथे येत-जात असत व जुन्या मित्र मंडळीत निवांत रमत असत.

Dada Kondke
Dada Kondke

विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे दादा कोंडके अभिनेते म्हणून प्रसिद्धीस आले. इ.स. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या (इ.स. १९७१), आंधळा मारतो डोळा (इ.स. १९७३), पांडू हवालदार (इ.स. १९७५), राम राम गंगाराम (इ.स. १९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (इ.स. १९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होते.

दादांचे (Dada Kondke) पितासमान गुरु बाबा उर्फ भालजी पेंढारकर यांचा तांबडी माती हा त्यांचा पहिला चित्रपट. ह्या चित्रपटानंतर दादांनी कधीच मागे वळून बघितले नाही. ‘सोंगाड्या’ ही दादांची पहिली निर्मिती, हा चित्रपट खुप गाजला व त्यांच्या जीवनातील मैलाचा दगड ठरला. दादांनी मराठीत एकुण १६ चित्रपटांची निर्मिती केली, विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले ह्या विक्रमामुळे त्यांच्या नावाची गिनीज बुकामध्ये नोंद झाली. त्यांनी हिंदीत सुद्धा ४ चित्रपटांची निर्मिती केली,उषा चव्हाण ही त्यांची आवडती तारका असल्यामुळे अनेक चित्रपटात तीच नायिका म्हणून पाहण्यास मिळते.

दादांच्या चित्रपटातील असणारे द्विअर्थीय शब्दांमुळे र्बयाच वेळा सेंसर बोर्डशी त्यांचा वाद-विवाद घडून सुद्धा व काहीशे चित्रफीत कट करूनसुद्धा त्यांच्या चित्रपटांना भरपूर प्रतिसाद प्रेक्षकांनी त्यांना दिला. त्यांचे व्यक्तिमत्व राजकीय तसेच खाजगी गोष्टींमध्ये सुद्धा वादग्रस्त राहिले.

पथ-नाट्यात आपल्या विशिष्ट विनोदामुळे हास्य उसळवणा-या दादांचे प्रसिद्ध होणे हे त्यांच्या सेवादलातील साथीदारांना पहावले गेले नाही, व त्या मुळे त्यांना सेवा दलातून फारकत घ्यावी लागली. परंतु दादा न थांबता तत्पर कलेशी एकरूप राहून दादांनी कलेचा उचांक गाठला.

Dada Kondke
Dada Kondke

आता शाहीर दादा कोंडके (Dada Kondke) वसंत सबनिसांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले. दादांच्या आयुष्यातील हे वळण दादांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले. दादांनी परत मागे वळून कधी पाहिलेच नाही. ‘विच्छा’चे १५०० हून अधिक प्रयोग झाले,आणि दादांसारखे रत्न भालजी पेंढारककरांसारख्या पारख्याच्या नजरेत पडले.

१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती’ ह्या चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी (Dada Kondke) मग मागे वळून बघितले नाही. जून १९७१, ‘सोंगाड्या’ प्रदर्शित झाला. सोंगाड्याला सुरुवातीला सिनेमागृह मिळत नव्हते. बाळासाहेब ठाकरे, जे तेव्हा फक्त ‘मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे’ होते, त्यांनी सोंगाड्याला सिनेमागृहाची सोय करून दिली आणि सोंगाड्या तुफान गाजला इतका की ब-याच सिनेमागृहांनी जेमतेम चालत असलेला देव आनंदचा ‘तेरे मेरे सपने’ उतरवला आणि सोंगाड्या लावला. महाराष्ट्राने सोंगाड्या डोक्यावर उचलून घेतला, खुद्द दादा कोंडके यांना मिळालेल्या अभूतपूर्व यशाने भारावून गेले होते. मिळालेल्या लोकप्रियतेचा पुरेपूर वापर करून घेत दादांनी लगेच पुढल्या चित्रपटाची घोषणा केली.

१९७२ साली ‘एकटा जीव सदाशिव‘ प्रदर्शित झाला, या चित्रपटाची हाईप इतकी झाली होती की खुद्द राज कपूरने आपल्या मुलाच्या (ऋषी कपूर) लॉन्चीग चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आणि ‘बॉबी’ पाच महिने उशिरा प्रदर्शित केला. असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना ‘एकटा जीव सदाशिव’ उतरवण्याची विनंती करायला लागली होती. बॉबी गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या ‘आंधळा मारतो डोळा’ने लाईम-लाईट पुन्हा दादा कोंडकेंवर आणला.

१९७५ मध्ये पांडू हवालदारच्या रुपात दादा (Dada Kondke) पुन्हा पडद्यावर आले. पांडू हवालदार मध्ये दादांनी ‘अशोक सराफ’ या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते. मुंबई पोलिसांचा हा हवालदार तिकीट्बारीवर टक6 च्या एजंटला भारी पडला. पांडू हवालदारमुळे मुंबईत लावायला सिनेमागृहे मिळेनात, कधी नव्हे ते जेम्स बॉंडचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला, त्याचबरोबर दादांचा आलेख मात्र चढत गेला.

आयुष्याच्या शेवटी आपल्या सोबत आपले कोणीही नाही याची मात्र खंत दादांना होतीच, त्यामुळे दादांनी ‘एकटा जीव’ या चरित्रात लिहिल आहे की, “पुढच्या जन्मी मला पैसा, यश, प्रसिध्दी काहिही दिल नाही तरी चालेल, पण एकटेपण देऊ नये, माझी म्हणता येतील अशी चार माणस द्यावी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे” अशा या हरहुन्नरी कलाकाराचा मुंबई येथे १४ मार्च १९९८ रोजी मृत्यू झाला.

लेखक-पद्माकर

दादांन (Dada Kondke) बद्दल व या लेखा बद्दल आपले अभिप्राय खाली दिलेल्या Comment-Box मध्ये नोंदवायला मात्र विसरू नका,तुमच्या एका Comment मुळे आमच्या लेखकास एक शक्ती व उत्त्साह मिळतो.

“तुम्ही आमच्या कामाला पाठिंबा द्याल का? कृपया आज Marathimonday.com ला आर्थिक भेट देण्याचा विचार करा”


Leave a Comment